उत्तर पश्चिम रेल्वे क्षेत्र


उत्तर पश्चिम रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. २००२ साली स्थापन झालेल्या उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय जयपूर रेल्वे स्थानक येथे असून राजस्थान राज्याचा बव्हंशी भाग उत्तर पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत येतो.
विभाग
उत्तर पश्चिम रेल्वेचे चार विभाग आहेत.
प्रमुख गाड्या
उत्तर पश्चिम रेल्वेद्वारे खालील प्रमुख रेल्वेगाड्या चालवल्या जातात.
- अरवली एक्सप्रेस
- चेतक एक्सप्रेस
- जयपूर-मुंबई सेंट्रल दुरंतो एक्सप्रेस
- सूर्यनगरी एक्सप्रेस